| 721 |
40449686 |
सैतवाल मुखपत्र ? |
|
|
अंधश्रद्धा आणि कर्मकांडा मध्ये अडकलेला वर्तमान जैन धर्म
मयूर मल्लिनाथ वग्यानी, सांगली महाराष्ट्र, + 91 9422707721
एकविसाव्या शतकामध्ये भ आदिनाथ, भ पार्श्वनाथ आणि भ महावीरांनी सांगीतलेले तत्वज्ञान आपला समाज विसरत चाललोय. आपला समाज आज कर्मकांडामध्ये अडकलाय.बहुसंख्या जैन समाज आज मुलगा व्हावा, लग्न व्हावे, नोकरी मिळावी म्हणून संकष्टी,दत्ताचा गुरुवार, शंकराचा सोमवार करतोय, कुणी पैसा मिळावा म्हणून तिरुपतीला साकडे घालतोय. कोणी घरी सत्यनारायणाची पूजा घालतोय.आपल्या मध्ये सध्या सत्यनारायण पूजा घालायचे प्रमाण स्त्रियांच्या मध्ये वाढलेले आहे.हि चिंताजनक बाब आहे.
वैदिकांचे ऐकून नरसोबाच्यावाडीला व त्रंबकेश्वरला जाऊन कालसर्प, नागबळी, पित्रूदोषाची पुजा घालतोय. आपला बहुसंख्य समाज शिर्डी, शेगाव अक्कलकोट येथील महाराजांचे प्रकटदिन साजरा करतोय. दत्त जयंती पण साजरा करतोय.
कुठे जायचे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझे एवढेच म्हणणे आहे कि तुम्ही सारासार विचार करा, ते सांगतात त्याचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करा, त्यांना प्रश्न विचारा , काय चांगले आहे ते घ्या, पण ते सांगतात ते खरे असेलच असे नाही. तुम्ही शिकलेले, सुशिक्षित आहात, तुम्ही शाळा, कॉलेज मध्ये विज्ञान शिकलेले आहात. वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करा. आणि ते सांगतात म्हणून कुठल्याही दुसऱ्या धर्म बद्दल द्वेष करू नका त्यांच्या सारखे धर्मांध बनू नको.
आपण जेव्हा मंदिरा मध्ये जातो तेव्हा णमोकार मंत्र म्हणतो, तेव्हा आपण अरिहंतांना, सिद्धांना , आचार्यांना , उपाध्यायाना आणि सर्व साधूनां नमस्कार, नमन करतो. आपण आपल्या तीर्थकरांसमोर कोणतेही उपकार किंवा भौतिक लाभ मागत नाहीत. णमोकार मंत्रा मध्ये देवतांच्या कोणत्याही विशिष्ट नावाचा किंवा विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख नाही हेच जैन धर्माचे वैशिष्ट आहे.
अंधश्रध्देपायी समाजाचा वेळ आणि पैसा नाहक वाया जात आहे. ते समाजाला देवाच्या नावाने घाबरून सोडतात. ते सांगतात कि तुमचा हातात काही नाही सगळे देवच करतो. देव पावावा म्हणून विविध प्रकारच्या पूजा घालायला लावतात.
आपल्या लोकांच्यावर वैदिकांनी एवढा प्रभाव टाकला आहे कि आपल्या धर्माचे लोक कुंभमेळा मध्ये मध्ये डुबक्या मारून आले आहेत. तीर्थ म्हणून तिथले पाणी घेऊन आलेत.
आज आपल्या धर्मा मध्ये अनेक विवाह वैदिक पद्धतीने विवाह होत आहेत. कारण या लोकांच्यावर वैदिक संस्कृतीचा जास्त प्रभाव आहे. त्यांच्या घरा मध्ये वैदिक देवांचे फोटो लावलेले दिसतील. आपल्या देवांचे फोटो त्यांच्या घरा मध्ये दिसणार नाहीत.
जगा मध्ये कष्ट केल्या फुकट काहीही मिळत नाही. तुह्मीच तुमचे भविष्य घडवू शकता.
आपल्या लोकांना त्यांच्या आश्रम व मठामध्ये महाआरती, महाप्रसादला बोलावले जाते.आपल्या धर्माचे अनेक लोक त्यांच्या आश्रमाच्या कार्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांना मोफत धर्माची पुस्तके, ग्रंथ दिली जातात. त्यांचे मासिके वाटले जातात, त्या मासिकांमध्ये दुसऱ्या जातींबद्दल, धर्माबद्दल द्वेष भरलेला असतो. त्यांच्या धर्माचे महात्मे सांगितले जाते. मग हळू हळू त्यांच्या संघटने मध्ये बोलावले जाते. तिथे सांगितले जाते कि जैन हि सनातन धर्माची शाखा आहे, जैन हि हिंदू मधली एक जात आहे असे बिंबवले जाते. त्यांच्या मनात दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष भरला जातो. आपल्या धर्मामध्ये द्वेषाला आणि हिंसेला स्थान नाही . आपला धर्म जगा आणि जगू द्या तसेच सर्व धर्म समभावाची शिकवण देतो.तसेच जैन धर्माचे स्वतंत्र अस्तित्व त्यांना मान्य नाही. जैन सनातन धमाची शाखा आहे असा खोटा प्रचार करून तो आपली लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या समाजाची बहुसंख्य लोक त्याला बळी पडत आहेत.त्यामुळे जैन समाजाने वेळीच जागे व्हावे नाही तर ५०/१०० वर्षा मध्ये हे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व संपवून टाकतील.आणि हे फक्त आपल्या इथे नाही तर आणि आपल्या धर्माचे या विचारसरणीचे लोक भारतात आणि विदेशातही आहेत जे वैदिक विचारसरणीला बळी पडले आहेत. . आणि हे आपल्या धर्माचे सगळे शिकलेले सुशिक्षित लोक आहेत.
तर आपल्या समाजाचे लोकांनी त्यांना विचारले पाहिजे कि तुह्मी आमची श्रमण संस्कृती संपवली त्याचे काय, तुम्ही आमची हजारो पुरातन मंदिरे ताब्यात घेतले, ती तुह्मी आमच्या ताब्यात देणार आहात का? गिरनार बद्दल त्यांचे साधू आपल्या समाजाला धमक्या देत आहेत, केशरिया, पालीथाना, शिखरजी आणि असे बऱ्याच जैन क्षेत्रांवर याच लोकांनी अतिक्रमण करून ती ताब्यात घेण्याचे प्रयन्त चालू आहेत. शंकराचार्यांनी भक्ती चळवळ द्वारे ७/९ शतका मध्ये हजारो जैन मुनींना,श्रावकांना चरक्या मध्ये घालून जाळण्यात आले. याच शंकराचार्यांनी कुठे तरी लिहून ठेवले आहे कि, समजा जर तुमच्या मागे हत्ती लागला आणि तुह्माला जर पुढे जैन मंदिर दिसले तर हत्तीच्या पायाखाली तुमचा जीव गेला तरी चालेल पण जैन मंदिर मध्ये प्रवेश करू नका. नंतरच्या काळात कुमारीला भट्ट (८ वे शतक), रामानुजाचार्य (११ वे शतक), महादेवाचार्य (१३ वे शतक) यांनी आपला वैदिक धर्म आक्रमकपणे वाढवायला सुरवात केली. राजे लोकांना धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले. राजाने धर्म बदलताच प्रजा देखील भितीपोटी आपला मूळ जैन धर्म सोडून वैदिक धर्मात प्रवेश करु लागली. हजारो जैन मंदिरे शैव व वैष्ण्व मंदिरामध्ये परिवर्तित करण्यात आली.
आणि आजही तीच परिस्थिती गिरनार, केशरिया आणि शिखरजीची झाली आहे.
जैन परंपरेनुसार गिरनार हि हजारो वर्षा पासून नेमिनाथांची भूमी आहे. पण आज तिथे दत्ताची मूर्ती बसवून अतिक्रमण झाले आहे. आज गिरनार पण आमच्या हातून गेले आहे. त्या लोकांनी गिरनार हे दत्ताचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध केले आहे. आज तिथे जैन धर्माचे अस्तित्त्व संपवून टाकण्याचा आतोनात प्रयत्न चालू आहेत.
केशरिया वर तिथल्या स्थानिक भिल लोकांचा दावा आहे. त्या मंदिरात हिंदू देवतांच्या प्रतिमा ठेवल्या आहेत. या मंदिराला भिल्ल समाजाचे लोकही भेट देतात. ते ऋषभनाथाची पूजा काला-जी किंवा भोमिया म्हणून करतात.
शिखरजीवर स्थानिक आदिवासी संथाल समाज यांच्या हक्क सांगण्याच्या लढाईमुळे जैन आणि आदिवासी यांच्यात संघर्ष सुरु आहे. संथाल समाज याला 'मरंग बुरू' (सर्वोच्च देवता किंवा महान पर्वत) असे मानतत. त्यांना जैन समाजाचा हक्क मान्य नाही .
तर देशा मधले प्रमुख धार्मिक स्थळे जसे शिकरजी, गिरनार, पालिताना, केसरीया आणि आपले अनेक तीर्थक्षेत्र आपल्या ताब्यातून घेण्याचा आतोनात प्रयत्न चालू आहेत .
आपल्या लोकांच्या मध्ये वाचन संस्कृती कमी होत चालली आहे.लोकांना सोशल मिडियातील बातम्या खऱ्या वाटतात.कित्येक लोकांना जैन ही जात नसून स्वंतंत्र धर्म आहे हे सुध्दा माहित नाही.
भ. महावीरांच्या काळी संपूर्ण भारतभर पसरलेला जैन धर्म आज आपले अस्तित्व विसरत चाललाय.
आज आपल्यातले काही लोक स्वतःला हिंदू म्हणून घेण्यात धन्य म्हणतात. तर आपल्याला त्यांना शहाणे केले पाहिजे, त्यांचे प्रभोधन केले पाहिजे. त्यांना सांगितले पाहिजे कि जैन हा स्वतंत्र धर्म आहे आणि ती कुठल्याही धर्माची शाखा नाही. जैन धर्म हा भारतातील सर्वात प्राचीन धर्म आहे. प्राचीन हिंदुस्थानात जंबुद्वीप - भरतक्षेत्राची स्थापना भ. आदिनाथांचा मुलगा चक्रवर्ती भरत यांनी केली आणि त्यांच्या वरूनच आपल्या देशाला भारत या नावाने ओळखले जाऊ लागले. आपण ह्या देशाचे मूलनिवासी आहोत. एकेकाळी ह्या देशावर आपले राज्य होते. पहिले तीर्थकर भ. आदिनाथांपासून भ. महावीरांपर्यंत आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य, त्यांचा मुलगा बिंबिसार, सम्राट अशोकांचा मुलगा कुणाल, त्यांचा मुलगा संप्रती, सम्राट खारवेल, अमोघवर्ष, चालुक्य, राष्ट्रकूट, कदंब,चोल, शिलाहार, राणी अब्बक्का हे सगळे राजघराणी जैन धर्मीय होते.
आपल्या धर्माच्या विविध लोकांच्या बरोबर भेटल्यावर मी चर्चा करत असतो. त्या मध्ये मला असे आढळून आले आहे ,
१) आपल्या काही लोकांचा असा समाज आहे कि जैन हि हिंदूंची शाखा आहे, तर काहींचा समज आहे कि पूर्वी जैन आणि हिंदू एकच होते आणि नंतर वेगळे झाले .
२) काहींना भ. आदिनाथ आपले पाहिले तीर्थकर आहेत हे माहित नाही. काहींचा असा समज आहे कि भ. महावीर हे जैन धर्माचे संस्थापक आहेत.
३) काहीं लोकांना हे माहित नाही कि भरतक्षेत्राची स्थापना आदिनाथांचा मुलगा चक्रवर्ती भरत यांनी केली आणि त्यांच्या वरूनच आपल्या देशाला भारत या नावाने ओळखले जाऊ लागले.
४) आपले काही लोक आपल्या मंदिरामध्ये येत नाहीत, काही जण फक्त सणासुदीला भेट देतात. काहीजण गणपती, शंकर,दत्त, काही जण गजानन महाराज, स्वामी समर्थ, साई बाबा मंदिराला रोज जातात.
५) काही जण स्वतःला कट्टर हिंदू समजतात. ते एवढे कट्टर झालेत कि आपण जैन धर्मा मध्ये जन्मलो आहोत हे विसरूनच गेले आहेत
श्रावक येत नसल्यामुळे आपले मंदिर मोकळे पडले आहेत. मंदिरामध्ये वयस्कर स्रिया आणि पुरुषांची संख्या लक्षणीय आहे हि एक चांगली गोष्ट आहे. पण तरुणांची संख्या फार कमी आहे.
आणि आपले दुर्दैव म्हणजे हे सगळे उच्च शिक्षित लोक आहेत. याना जैन धर्माचा इतिहास माहित नाही. सोशल मीडिया, व्हाट्सअप वर आलेल्या खोट्या बातम्या आपल्या धर्माच्या सुशिक्षित लोकांना खरे वाटतात.
जैन समाजाला जागरूक केले पाहिजे, सरकारी जनगणने मध्ये, मुले जन्मतात त्या वेळी हॉस्पिटल, शाळा व कॉलेज मध्ये धर्म जैन म्हणूनच नोंद करावी. त्या मुळे आपली लोकसंख्या नक्की किती आहे ती कळण्यास मदत होईल. कारण इतकी वर्ष आपण ऐकतोय कि सरकारी जनगणनेनुसार आपली लोकसंख्या ४५ लाखच आहे. तर ती साधारण १ कोटीच्या आसपास असायला हवी.
एकेकाळी बहुसंख्या असलेले जैन अहिंसावादी धर्म आज अल्पसंख्य झाल्यामुळे आपल्या देशाचे अपरिणीत नुकसान झाले.
जैन तत्वज्ञान हे विज्ञानाला धरूनच चालत आहे. जैन तत्वज्ञान प्रमाणे विश्वाचा करता करवता कोणी नाही, ती पूर्वीही होती आणि पुढेही राहणार आहे. ती कुठल्याही देवाने बनवली नाही सृष्टीचा काळ अनादी आणि अनंत आहे. काळाचे हे अनादी व अनंतत्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे.
ईश्वर हा सुष्टीचा निर्माता आहे हि संकल्पना जैन धर्म मानत नाही.. वैदिक युगायुगात जगाची सृष्टी व प्रलय या गोष्टी मानतात तर जैन हि सृष्टी अनादि काळापासून असल्याचे मानतात. आणि जगातल्या शास्त्रज्ञ पण हेच सांगत आले आहेत.
वैदिक मता प्रमाणे ईश्वराची भक्ती केल्याने त्याच्या कृपेने मनुष्यास लाभ होतो, तर जैन मानतात कि आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माणा अनुसरुन जीव स्वतःच सुखी किंवा दुखी होतो.
आपले तीर्थकर मोक्षदाता नाहीत, ते तुम्हाला मोक्ष देणार नाहीत. ते तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवतात.त्या मार्गावर चालण्याचे काम आपल्याला करायचेय.
मला जे वाटते ते प्रत्येक वेळी बरोबरच असेल असे नाही. मला जे पटते ते प्रत्येक वेळी योग्यच असेल असे नाही. दुसराही बरोबर असु शकतो, दुसऱ्याच्या म्हणण्यालाही काही अर्थ असु शकतो, हे जगण्याचे तत्व जैन धर्म शिकवतो. त्याला अनेकांतवाद म्हणतात.
आजचा जैन समाज अंधश्रद्धा आणि कर्मकांड मध्ये फसलेला आहे त्याला यातुन कसे बाहेर काढायचे याचा समाजाने विचार करणे गरजेचे आहे .
.
आपले थोर आचार्य , उपाध्याय आणि साधूनां नमन करतो ज्यांनी आपल्या धर्माचे अस्तित्त्व, आपली परंपरा, आणि तत्वज्ञान जिवंत ठेवण्याचा खूप महत्वाचे कार्य केले आहे. आणि त्याच बरोबर आपल्या धर्माचे इतिहासकार, साहित्यिक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था जे अहोरात्र आपलं धर्म जिवंत ठेवण्याचा प्रयन्त करत आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच सर्वात महत्वाचे आपल्या धर्माच्या स्त्रियांचे मोठे योगदान आहे ,जे न चुकता मंदिराला येतात, सर्व कार्यक्रमा मध्ये उत्साहाने भाग घेतात तसेच आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या धर्माचे संस्कार देण्याचे मोठे काम उत्साहाने करत असतात. त्यांचे पण मनापासून आभार.
आपल्या धर्मातील सर्व पंथाना एकत्र येऊन समाजाला या संकटातून बाहेर काढले पाहिजे. |
|
2026-02-12 14:45:01 |
|